Tuesday, 29 September 2020

Lockdown Tales १ नौरोबाने पहिल्यांदा केलेला शिरा :

 Lockdown Tales 


१ नौरोबाने पहिल्यांदा केलेला शिरा :


Lockdown मुळे ज्यांना शक्य आहे ते सगळेच घरी राहून काम करतायत,सोप्या भाषेत Work From Home चालू आहे. त्यात ज्या लोकांचे client अमेरिकन आहेत त्या काहींना रात्री काम करावे लागते त्याच काही मधले आम्हीही आहोत.

तर झाले असे सकाळी रोजच्या वेळेला म्हणजे साधारण चार वाजता आमचे काम संपले आणि माझ्या नौरोबाला शिरा खाण्याची इच्छा झाली.असेही ऑफिस कामामुळे रात्री नीट जेवण होत नाही आमचं सो सकाळी सकाळी भरपूर वेळा भूक लागते. मग काय स्वारी ड्राय फ्रुट्स बारीक करून देण्याच्या तयारीत, तू रवा भाज मी तयारी करून देतो म्हणत सरळ मला घेऊन किचन मध्ये हजर.

कढई शेगडी वर ठेवली रवा भाजून घेतला, तो खाली काढताना कढई ताई आमच्या हातावर विराजमान झाल्या.कढई आणि हातामध्ये वाद झाले बहुतेक हात रागाने बराच लाल झाला होता, धड चमचाही हातात धरता येईना.

मग काय, मलम पट्टी झाल्यावर Mr नी घेतला पुढाकार आणि लागले कामाला. काही टिप्स घेणं देणं झाल्या आणि मस्त यम्मी वास घरात फिरू लागला. लवकरच कढई तुन डिश मध्ये आणि डिश मधून जिभेवर आगमन झाले. या शिऱ्याच्या चवीत हाताला भाजलेलं कधीच विसरून गेले होते.

त्या दिवशी वाटले " Morning Be Like "


(हाताला भाजल्याचा एक फायदा झाला, यापुढे शिऱ्याचे कायम चे कॉन्ट्रॅक्ट माझ्या नौरोबाकडे कडे गेले. ;) )


                                     @ किर्ती कुलकर्णी 

Sunday, 30 August 2020

निरागस !!!

प्रॉब्लेम काहीच नाहीए,

आत्ताही नाहीए तेव्हाही नव्हता,

पण काहीतरी चुकतेय,

किंवा चुकलंय,

ऑफिस च काम संपलं थोडं रिकामा झालो होतो,

सहज म्हणून FB उघडलं,

बायकोच्या म्हणजेच अनु च्या  एका मैत्रिणीने मेमोरी टाकली होती,

खूप प्रसन्न वाटत होती अनु,

मोठे मोठे डोळे उत्साह ओसंडून वाहणारे,

ते हसू खूप निरागस होत,

त्याच निरागस हास्यावर मी भुललो होतो ना?

हो ना त्याच वर,

तिने माझ्यात काय पाहिलं पण?

जे पाहिलं ते खरंच होत का?

लग्नानंतर काय अपेक्षा होती तिची,

वेळ?

एकमेकांसोबत? का नाही दिला मी?

घरात आल्यापासून फक्त आणि फक्त तिचे कर्तव्य,

माझ्या बहिणीची लग्न झालेले असूनही नुसती माझ्याच घराचं लक्ष,

त्यात तात्या म्हणजे वडील त्यांनाच दुजोरा देणारे,

पहिले एक वर्ष शांतपणे घ्यायची ती,

नंतर तिची खूप चिडचिड व्हायला लागली होती,

किती वेळा तिने डायरेक्ट सांगितलं मला,

मी मात्र साफ दुर्लक्ष केलं,

नंतर नंतर तिची चिडचिड ही कमी झाली आणि घरातली संसारातली इच्छा पण,

त्यासोबत तिचे हे निरागस हसू,तो उत्साह सगळंच हरवलं मी,

आठवत एकदा ती बोलली होती आई बाबा ना थोडे दिवस तरीगावी जाऊदेत,

इच्छा तरी काय होत्या तिच्या एखादी पाणीपुरी एकत्र किंवा एका डिश मधली भेळ,

ही ही मी दिल नाही,

माझ्या बहिणींना आता मुलं झाली आहेत त्यांच्यात त्या पूर्ण व्यस्थ झाल्या आहेत,

पण हिच्या मात्र इच्छा अजूनही पूर्ण झाल्या नाहीत,

आजही तिचा संसार तिला मिळाला नाहीए,

आई वडिलांच एव्हडं वय झालेय पण अजूनही त्यांचा हेका सुटत नाहीए,

आणि मी आजही माझ्या बायकोला माझं बनवू शकलो नाहीए,

तिला मी घडवलं तर नाही पण जशी होती तसाही राहू दिल नाही,

पण आता मी सुधारणारे तिचा निरागस हसू तिला देण्याचा प्रयत्न मी करणारे.


आणि मला माहितीय ती तशीच मूकपणे मला साथ देणार आहे.....


I Love you अनु!!!



                              @ किर्ती कुलकर्णी 

Saturday, 8 August 2020

अंधार !!!

गर्द एकटी या अंधारात मी चालत आहे,

कुठे कधीही न भेटणारी वाट मी शोधत आहे,

चुकून भेटलेला कवडासाही आज सोडत आहे,

मिळणाऱ्या सुप्त विचारांनाही मी मारत आहे,

कधी वाटते हा तर नियतीचा खेळ,

नंतर कळते हि तर आपल्याच माणसाने आणलेली वेळ,

दम घुटतोय या अंधारात आता,

श्वासासोबतच सुटणार वाटतेय, हा अंधार आता.......


                       @ किर्ती कुलकर्णी 

Wednesday, 20 May 2020

तिच्यातली ती!!! भाग 3

तिच्यातली ती!!!

भाग 3

मीच रेवाला म्हणाले, " काय हो मॅडम काय झालं? जेवण अंगी लागलेय का? काहीच का बोलत नाहीहेत? की येणाऱ्या सुनेची आधीपासूनच भीती वाटू लागलीय? "
तशी रेवा बोलली," नाही गं, अनुराग च लग्न ठरवायच्या आधीच मी एक निर्णय घेतलाय."
तास आम्ही दोघीही चपापलो. "काय निर्णय घेतलायस?" हा प्रश्न दोघींच्याही डोळ्यात होता.
माझा निर्णय सांगण्याआधी तो मी का घेतला हे मला सांगायचंय.
" मला सांगा मुलं लहान असत तेव्हा आपण त्या मुलाला एकटं कुठे जाऊ देत नाही, त्यांनतर आपण लक्ष ठेवून मुलांना एकटं जाऊ देतो. जेव्हा त्यांना आणि आपल्याला आत्मविशवस येतो की आता ते स्वतंत्रपणे ते काम करू शकतात तेव्हा आपण निर्धास्त असतो. त्याच बरोबर आपण त्यांना काय चूक काय बरोबर हे सांगतोच ना?"
" जर अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या अनुभवाने मुलांना सांगतो, जे आपण चुकलोय ते त्यांनी चुकू नये हे प्रयत्न करतो मग ते संसाराला लागतात तेव्हा आपले बोल का नाही?"
" आत्ताचे मुलं समजून उमजून लग्न करतात. अगं, आपण लग्नाआधी मुलं बघायला जायचो आपण दगड, विटा बघायचो आत्ताच्या मुली दगड, विटा पाहत नाहीत. कारण ते बांधण्याची धम्मक त्या ठेवतात. त्या पाहतात घर कसं ठेवलेय? स्वच्छ आहे का? कोणती गोष्ट कमी आहे घरात? घरातल्यांच्या सवयी कश्या आहेत ?"
रेवाने एव्हडं बोलून आम्हालाच प्रश्न केला ." मी चुकीचं बोलतेय का?"
प्रज्ञा थोडी चिडलेली दिसली ती बोलली," म्हणजे ती नवीन मुलगी येणार म्हणून आपण आपल्या चाळीस वर्षांच्या सवयी बदलायच्या का ? नवीन घरात येणारी ती आहे तिने सांभाळून घेतलं पाहिजे ना?"
रेवा पुढे बोलू लागली, " बरोबर आहे तुझं तिने सांभाळून घेतलं पाहिजे. पण प्रज्ञा आत्ता थोडा वेळ आधी तूच स्वप्न, इच्छा, आकांक्षा बद्दल बोलत होतीस ना? मग ती जी मुलगी येणारेय घरात, तिच्या स्वतःच्या संसाराकडून, आयुष्याकडून, नवऱ्याकडून काही स्वप्न नसतील काही इच्छा नसतील?"
" अगं किती छोट्या मोठ्या गोष्टी असतात तुझाच उदाहरण घे तुला तुझ्या आई ने तो पोळपाट दिलाय, म्हणून तुला प्रिय आहे.पण तिच्याही आईने तिला दिल असेल ना काहीतरी, कित्तेक मुलींच्या बापाने दिलेला संसार कुठला तरी कोठीत नाहीतर, पेटीत पडलेला असतो. तिच्या भावना जळत नसतील तेव्हा? घर म्हणलं की काय नसत गं? अगदी तांदूळ कुठला घ्यायचा इथपासून घर कुठे घ्यायचं एवढे प्रश्न असतात? माझं स्पष्ट मत  आहे एका घरात दोन संसार कधीच चालत नाहीत. आता माझाच घे माझं लग्न झालं तेव्हा माझी जाऊ होती घरात तीही मोठी, त्यात सासूबाई अंथरुणात, म्हणून घरात सगळ्या गोष्टी त्याच पाहायच्या. खूप छोटी गोष्ट आहे पण अजून सलते मनात माझ्या मला पहिल्या अधानाचा चहा अजिबात आवडत नाही पण त्या तोच बनवायच्या आणि दूध, तूप, दही सगळं त्यांच्या ताब्यात. कोणत्याही गोष्टीची मुभा नव्हती.कोणत्याही वेळी चहा घेताना मला माझं महेर आठवायचं. प्रत्येक गोष्ट करताना मला त्यांचा विचार करावा लागायचा. अगं आमच्या ह्यांना भोपळा आवडत नाही आणि एकदा मी भोपळ्याचा भात बनवला आणि ह्यांनी आणि सगळ्यांनीच खूप आवडीने खाल्ला आणि आमचे मोठे भाऊजी जाऊबाईंना बोलले तू रेवा सारखा भात बनवायला शिक. बापरे, किती राग आला होता त्यांना. त्यानंतर छोट्या मोठ्या कुरबुरी चालू लागल्या ते सासूबाई आणि मामंजींच्या देहांतानंतर वेगळे झालो आणि थांबल्या."
एवढ्या वेळ शांत बसलेले मी पण मलाही रेवाची बाजू पटत होती.
तेव्हाच प्रज्ञा म्हणाली," म्हणजे नात्याला काहीच अर्थ नाही? त्या नात्याचा काहीच आदर नाही?"
रेवा बोलू लागली," नात्यात आदर आपल्या वेळी होता आता आदर कमवावा आणि टिकवावा लागतो. प्रत्येकाने आपापला."
"तुला नेमकं काय म्हणायचंय?" प्रज्ञा
"मला एवढाच म्हणायचंय, "कालये तस्मेय नमः !". जे आपल्या वेळी होत ते आत्ता अपेक्षित नको आणि कोणावर जबरदस्ती तर अजिबात नको.अगं आपण जे सहन केलं ते इतरांनी का करावं? "
पूर्ण संभाषणात मी पहिल्यांदीच बोलले होते." मला पटतेय तुझं रेवा.अगं जेव्हा आपण आपल्या मुलांचं लग्न लावताना त्यांच्या मर्जीने, त्यांना पसंद पडत नाही तोपर्यंत लग्न नाही करत मग संसार त्यांच्या मर्जीने का नाही? कुठे अडलेच तर आपण असूच की पण प्रत्येक गोष्टीत आपली ढवळा ढवळ कशासाठी? या बद्दलचा एक किस्सा माझ्यासोबत पण झाला. मी प्रत्येक वेळी माहेरी जाताना मला आजेसासूबाईंना घेऊन जावं लागायचं, कारण त्यांचं करणार कोणीच नसायचं घरी पण मला अजिबात इच्छा नसायची. त्या असतील तर मी माझ्या आईशी दोन शब्द शांततेत बोलूही नाही शकायचे, की नवं-जून ऐकूही नाही शकायचे.मनात खूप त्रास व्हायचा गं! असं वाटायचं,असं भेटण्यापेक्षा न भेटलेलं बरं. तसंच, माझ्या आई बाबांना माझ्याकडे खूप यावंसं वाटायचं, थोडंसं राहावं वाटायचं. पण सासू, आजेसासू सगळे असल्यामुळे कधीच नाही येऊ शकायचे.त्यावेळी वाटायचं हाकलून द्यावं यांनाच.पण काय करणार उपयोग नव्हता."
प्रज्ञाचा सूर आता थोडा वीरमला होता," खरंय गं, माझं लग्न झालं तेव्हा आम्हीही तीन जावा आणि सासू सासरे. तुझ्या शब्दात चार संसार एकत्र होते.रोजच कुरबुरी असायच्या कधी कोणामुळे तर कधी कोणामुळे कोणाच्याच मनात कोणाचा आदर नव्हता राहिला आता बघ ना सगळे वेगळे आहोत पण वळ बरेच राहिलेत."
"प्रज्ञा तू सुखी आहेस तुला samajdar  सून मिळालीय तिने तुमच्या बद्दलचा आदर कमी होण्याआधीच पाऊल उचललेय आणि तुझ्या मुलाने तिला त्यात साथ देऊन त्याने त्याच कर्तव्य बजावलेय." रेवा
"पण माझं घर तुटलं गं, माझा मुलगा तुटला.तो असं वागेल असं अजिबात नव्हतं वाटलं मला पण धोका दिला गं."प्रज्ञा
प्रज्ञा च्या वाक्यावर मी पटकन बोलले ,"कसला धोका गं ? तो दुसरीकडे राहायला गेला हा? आणि तो तुटला असं कस म्हणतेस? काही दिवस आधी तो देशाच्या बाहेर गेला होता, तीन वर्षांसाठी. वर्षात चार दिवसांसाठी येत होता. तेव्हा नव्हता का तुटला तो? आता तर आठवड्यात दोन वेळा भेटतो.ते काळजी पोटीच ना? लागणारे पैसे पाठवतो तेही काळजी पोटीच ना? तू म्हणतेस तुझी सून बाहेरून जेवण मागवायची, अगं आज एक दिवस आपण बाहेर गेलोय तर एव्हडं दमलो ती तर रोज जाते. आठवड्यात एखादा दिवस असेल तिचा व्यस्त. त्यादिवशी असेल तिला खूप काम, दमत असेल ती.नाही म्हणलं तरी सासू या नात्याचा दबाव येत असेल, नसेल सांगू शकत तुला काही गोष्टी आणि स्वछतेच म्हणशील, तर मीच म्हणते स्वच्छता असायलाच हवी. एखाद्यामध्ये असते जास्तच स्वच्छता तीही चुकत असेल पण घराच्या नावाखाली तीच खदखद मनात घेऊन जगायचं का? आपण होतो तश्या आत्ताच्या मुली असणं शक्य नाही आणि असूही नयेत.अगं मी म्हणेल याचा फायदा आहे. आता तुझी मुलगी माहेरपण चार दिवस जास्त जगेल. कारण घर फक्त आई वडिलांचं असणं आणि त्यात भावजय पण असणं खूप फरक असतो. या गोष्टीला सकारात्मकता दे.तुझ्या मुलीच माहेर पण तुझ्या सुनेनं वाचवलेय हे समजून घे."
रेवा बोलू लागली,"माझं ना कायम एक स्वप्न होत, छोटंसंच पण मनाला लागलेय ते. मला ना लग्न ठरलं तेव्हा अशी कल्पना यायची की मी स्वयंपाक घरात काम करतेय आणि हे हळूच मागून येऊन माझ्या केसात गजरा माळतायत. पण लग्न झालं आणि रहाटगाडग्यात येऊन पडले. स्वप्न तर सोड आमच्या सगळा वेळ दुसऱ्याचं  मन संभाळण्यातच जाऊ लागला.अगं मी केलेल्या भाजीच कौतुक पण वहिनींना आवडणार नाही म्हणून हे कधी करायचे नाहीत.खूप वाईट वाटायचं."
"जेव्हा अनुला मुलगी बघायला चालू केलं ना, भीती वाटत होती. माझं मन जस मारलं जात होत, माझ्या जावेमुळे उद्या आलेल्या सुनेबरोबर पण ते होऊ शकत.कारण तेव्हाही माझा आणि तिचा संसार म्हणजे पुन्हा दोन संसार एकत्र.मग ठरवलं जस प्रत्येक गोष्टीचा आरंभ करण्याआधी सभा होणं महत्वाचं असत तसंच लग्न कारण्या आधी मन स्वछ असणं महत्वाचं असत. त्यामुलीला माझ्या घरात काय हवेय आणि काय मिळणारेय याचा ताळमेळ मिळणं महत्वाचं आहे.कारण आपण सोशिक होतो आत्ता घटस्फोटाचं जग आहे आणि ते करूनही सुखी कोणीच होत नाही. त्यापेक्षा लग्नाची जशी ते तयारी करणारेत तशी त्यांची संसाराची तयारी पण झालेली असूदेत."
"जेव्हा अनुराग ने अनुष्काला पसंद केले येऊन मलाच सांगितले.त्यानंतर मी त्या दोघांनाही बोलावून आणि आमच्या ह्यांनाही समजावून एक प्रश्न केला " तुम्हाला लग्नाबद्दल काय माहित आहे?""
"दोघांकडेही उत्तर नसणे अपेक्षितच होत. हे वयचं असं असतं लग्न म्हणजे एक परिकथेचा खेळ वाटतो.पण जेव्हा होत, तेव्हा चालू होतो संसाराचं गाभा.मी अनुष्काला बोलले मला माहित आहे बेटा तू खूप समजदार आहेस हुशार आहेस माझ्या अनुराग ला संभाळशील पण बेटा फक्त अनुराग नाही होणारेय तुझा, त्याबरोबरची सगळी नाती तुझी होणारेत.मी लग्न करून आले होते तेव्हा अश्या खूप काही गोष्टी होत्या ज्या राहून गेल्यात त्याची खंत आजही वाटते.मला तुमच्या बाबतीत ते होऊ द्यायचे नाहीए. म्हणून मला वाटते लग्नानंतर काही दिवस, काही वर्ष तुम्ही आधी तुमचं नातं अतूट करा त्यानंतर इतर नात्यांकडे पहा.अनुराग बोलालाही मला आई अगं आमचं प्रेमविवाह आहे मला याची गरज वाटत नाही.पण त्याच्या बाबांनी त्याला समजावले अनु बाळा लग्न लग्न असतं प्रेमविवाह असूदेत की अजून कुठला.पुरुष एकदा नवरा झाला ना, तो कसा वागेल हे तो नवरा होईपर्यंत माहित नसतं. कारण एक हक्काची त्याची साथ न सोडणारी व्यक्ती आयुष्यात आलेली असते आणि सेम बायकोचही असतं. बेटा एकदा तुम्ही नवरा बायको म्हणून सफल झालात ना की जगात कोणीच तुम्हाला वेगळं नाही करू शकतnआणि तसं नाही झालं तर उरतात फक्त नात्याच्या कठपुतळ्या.अनुष्का तरीही तयार नाही झाली. तिला वाटत होत मी आणि अनुराग चे बाबा लग्नाला पूर्ण तयार नाही आहोत. मी तिला समजावले. किती छान मिठी मारली होती पोरीने तेव्हा मला."
प्रज्ञा," म्हणजे तू लग्नानंतर तुझ्या मुलापासून लांब राहणार?"
रेवा,"नाही त्याला त्याच्या आयुष्याची मजा घेऊ देणार.तो सुखात आहे हे दुरून पाहणार.काही लागलंच तर नक्की हजर असणार पण पहिला प्रयत्न त्यालाच करू देणार."
किती समाधानी वाटत होती रेवा, आयुष्यच गूढ गावसल्यासारखी!
नकळत मनात आलं,रेवाने हा निर्णय घेऊन खरा स्त्री पुरुष समानतेचा न्याय दिलाय का? भावनांचा बळी नेहमी मुलींचा जातो, कमीतकमी तिचा नवरा तिच्या सोबत राहील आणि होता होईल तो कमी बळी जाईल ही व्यवस्था तिने केली.
कित्येक दिवसांनी भेटून खरंच आम्ही भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ सकारात्मक बनवला. आम्ही साकारात्मकतेची पहाट पाहत होतो.
ही सकारात्मकता प्रत्येकाच्या आयुष्यात येउदेत ही देवचारणी प्रार्थना ठेऊन इथे मी थांबते.

                                          @किर्ती कुलकर्णी

कथा कशी वाटली ते कृपया कळवावे.
open for suggestions !!!

Tuesday, 12 May 2020

फास !!! (शशक - शत शब्द कथा)

फास (शशक - शत शब्द कथा)

गडद काळ्या खोलीत एक मुलगी आहे. गळ्याभोवती फास अडकलाय तिच्या, तरीही खुश दिसतेय.फोन वाजतो ती हसून हसून कोणाशीतरी बोलते.फोन ठेवून शांत बसलीय. तिकडून एक माणूस आलाय त्याने तिचा फोन पहिला. तो ओरडला तिच्यावर, फास घट्ट झालाय.
आजही, ती फोनवर बोललीय पुन्हा तो तिला ओरडलाय. आज ती त्याच्या पाया पडतेय.आज फासाने मानेवर वळ आलाय आणि हातही सोललेत. ती खचलीय, एकटी पडलीय.पण डोळ्यात पाणी नाही उमेद आहे.
नवरा संशयातून मानसिक छळ करतो, यामुळे हे न्यायालय सौ.रोहिणी यांचा घटस्फोट मान्य करत आहे.

खोलीतला अंधार दूर झालाय. फासाचे वळ आहेत पण इजा नाहीत. ती हसत नाहीए पण प्रसन्न आहे.

                             @ किर्ती कुलकर्णी 

Friday, 1 May 2020

शायर डायरी !!!

शायर डायरी!!!

१. इन्ही हातों से सजाई थी,
    सपनों की दुनिया !
    एक गलती माफ़ तो करके देख,
    शायद फिर से फूल खिल जाएँ !!

२. समय समय की बात है,
    कल जिससे डर रहे थे !
    आज उसी को,
    पैरों तले कुचल रहे है !!

३. जानते है उतनी औकात हम रखते नहीं,
    की तुम हमें गले लगा लो !
    बस हो सके तो,
    मुरदा बनने से पहले हमें माफ़ कर दो !! 

४. भविष्याच्या फुलात,
    जीव मज़ा विसावला !
    कळलच नाही कधी,
    भूतकाळाच्या भुंग्याने वार चढवला !!

५. गलती करने के लिए,
    चंद लम्हे काफी पड़ गये !
    उसकी चोंट,
    पूरी जिंदगी डूबा गये  !!

६. जिंदगी के कश्मकश में,
    हमारी कश्तियाँ साथ रहने देना !
    कभी रास्ते ख़राब हो जाएँ,
    तो अपनी कश्ती में थोड़ी जगह बना लेना !!

७.जिंदगी के हर पन्ने पर तेरा नाम लिखा है !
   कौनसा भी चैप्टर खोल, बस तेरा पैगाम लिखा हे !!

८. तेरी मोहब्बद हमें पूरा कर गयी है.
    हमारे जिंदगी के आशियाने भर गयी है !!

९. तेरे विश्वास को सुरमे की तरह,
   आँखों में सजा लुंगी !
   देख ना एक दिन,
   में भी तेरी जान बन जाउंगी !!

१०. उस दिन भी बिन बादल, बरसात हुई थी,
      जिस दिन तू छोड़ गयी थी !
      आज भी मौसम ऐसे ही कुछ रंग ला रहा है,
      शायद तूने और एक दिल तोडा है !!


                      @किर्ती कुलकर्णी 

मंसूबे !!

मंसूबे !!

क्यों नहीं बहता है तू,
नदीं की तरह,
क्यों उकसाये बैठा है,
समंदर की तरह?
भला हिमालय भी कभी टूटा है क्या?
फिर तू क्यों तुटता है?
एक हादसा ही तो हुआ है,
जान तो नहीं छूटीं?
शुक्र मान खुदा से,
उसने तुझे बक्शा है, बच्चे की तरह,
बहता रह तू नेकी करते,
बस मंसूबे रख उस नदीं की तरह!
मंसूबे रख उस नदीं की तरह!!

                      @किर्ती कुलकर्णी 

Thursday, 30 April 2020

तिच्यातली ती!!! भाग २

तिच्यातली ती!!!

भाग २
 
‎प्रज्ञाच नेमकं दुखणं मला आणि रेवाला समजलं होत.थोडासा काय ते म्हणता ना ब्रेन वॉश त्याची गरज होती पण त्याआधी गरज होती ती पोटोबाची.सगळ्याच दमलो होतो म्हणून स्वीगी च केलं.फ्रेश होऊन आवरलं तोपर्यंत पार्सल आले पण.
तिघींनीही आलेल्या जिन्नसावर ताव मारला आणि येऊन बसलो मागच्या अंगणात.
आज सकाळ पासून मोबाईल कडे लक्षच गेलं नव्हतं. लेकीचा मिस कॉल होता. दुसरा कॉल येण्याअगोदर कॉल केला पाहिजे, नाहीतर सासूबाई ओरडत नव्हत्या एव्हडं ओरडेल.मी त्या दोघींसमोरच नैना शी बोलत होते. तिने सांगितले की हेमंत देशपांडे या मुलाचा तिला फोन आला होता. तिने नोंदणी केलेल्या लग्नासंबंधीच्या इंटरनेट site वरून घेतला होता त्याने नंबर. बोलायला ठीक वाटला आणि माझी अटही त्याला मान्य आहे.किडनी रोग तज्ज्ञ आहे. पुण्यात स्वतःचे घर आहे.नामंकित रुग्णालयात उच्च पदावर रुजू आहे. घरी आई, बहीण आणि वडील इति मंडळी आहेत.माझी जशी अट आहे, तशीच त्याची पण आहे की तो आई वडिलांना सोडून कधीच वेगळं नाही राहणार. नैना चे हे तपशीलवार माहिती ऐकून घेतली आणि तिला बोलले भेटून घे मग. तुला योग्य वाटतेय तर आणि मग बघू पुढे कसं ते.
माझा हा कॉल संपताच रेवा म्हणाली," चला म्हणजे तुम्ही पण आहेत तर सासूच्या प्रोमोशन लिस्ट मध्ये." तशी पद्मा ने तिला दुजोरा दिला, " मी झाले सासू, एकदा नाही तर तब्बल दोनवेळा जावयाची आणि सुनेची आता तू पण होणार मग मीना का मागे?" तिच्या या वाक्यावर आम्ही तिघी ही हसलो.
हसता हसता प्रज्ञा शांत झाली आणि म्हणाली," पण हे प्रोमोशन काही सोसत नाही बाई, जिव्हारी लागत." तसं आम्ही दोघीही शांत झालो. असाही आम्हाला विषय काढायचाच होता बरं झालं तिनेच काढला ते.
आम्ही विचारलं काय झालं?
तशी प्रज्ञा बोलू लागली," सहा महिण्यात वेगळी झाली गं, माझी सून माझ्या लेकाला घेऊन.पैसे येतात आज पण अकाउंट ला पण घराला घरपण नाही राहिलं गं."
"अगं पण असा झालं काय की ती घर सोडून गेली? काही भांडण वेगैरे?" मी विचारलं
" नाही गं काहीच नाही.लग्नानंतर आमच्यात कामामुळे वाद नकोत म्हणून आम्हीच कामाच्या वाटण्या केल्या होत्या. सकाळी तिला वेळ नसायचा म्हणून सकाळचं मी करायचे सगळं आणि संध्याकाळी , संध्याकाळ कसली रात्रच म्हण तेव्हा ती करायची सगळं. आणि काम तरी असा काय गं चार लोकांचा स्वयंपाक बाकी सगळ्याला तर बाई लावलेली होती. ती स्वयंपाकालाही लावू म्हणाली मी म्हणाले, नाही लावायची.
आपल्या स्वयंपाक घरात दुसरं कोणी स्वयंपाक करणार कसं वाटत ते ? आणि मला बाई नाहीच आवडत माझ्या स्वयंपाक घरात दुसरं कोणी.
बरं तिला घरात सगळं नीटनेटकं लागायचं. मी सोफयावर बसून भाजी निवडत असेल तर मला म्हणायची, "आई सोफ्या मध्ये घाण अडकते तुम्ही डाईनिंग टेबलं वर बसून निवाडा. बरं हे ऐकलं तर म्हणे की आपण पोळपाट बदलूया, माझ्या आईने दिलेला तो पोळपाट अजून दणकट आहे, का बदलायचा? मी म्हणाले, " नाही बदलायचा." असंच छोट्या मोठ्या गोष्टी चालू असायच्या पण मी लक्ष नव्हते देत.मला हेच नाही पटायचं की मी सासू असून ती एव्हडं बोलते कसं? आपली काय टाप होती ग बोलायची?
अगं कित्येक वेळेला तिचा जेवण बनवायची वेळ असेल तर बाहेरून मागवायची. मला अजिबात नव्हतं पटत पण मी काहीही बोलत नव्हते.आमचे हे किती वेळेला चिडले माझ्यावर तू डोकयावर घेतेस तिला असाही म्हणाले पण मीच म्हणायचे जाऊदेत हो सोडा.
एकेदिवशी असंच तिला शनिवारी पण कामावर जावं लागले तिला. येताना संध्याकाळी ती जेवण घेऊन अली विकत. आता शनिवार म्हणजे ह्यांचा उपवास त्यांच्यासाठी उपवासाचा काहीच आणलं नाही. मी वरई केली आणि जेवलो सगळे. त्यादिवशी मात्र माझा पारा चढला आणि मी बोलले तुमचं तुम्ही करून खा आमचं आम्ही खातो. रोजच बाहेरच खान नाही परवड आम्हाला.भिक्कार चाळे, खिशाला चटक, अरे नवीन संसार आहे, काही तरी बाजूला टाका, फरपट होते नाहीतर. पोरीने ते जिव्हारी घेतलं दुसरे दिवशी दोघंही आमच्या रूम मध्ये आले आम्हाला वाटलं माफी मागायला आलेत, पण झालं उलटंच ते वेगळं राहणार होते. रात्रीच त्यांनी जवळचाच एक फ्लॅट भाड्याने घेतला होता तो बघायला चला असा सांगायला आले होते.नाही गेलो आम्ही.तिने माझा मुलगा तोडला गं माझ्या पासून." असं बोलून प्रज्ञा रडायला लागली.
तिचे डोळे पुसून तिला थोडे पाणी दिले आणि मी विचारले," तो गेल्यापासून त्याने काहीच संबंध नाही ठेवला का?
भाऊजींना पेन्शन पण नाहीए मग घर कसं चालत? ती येतच नाही का अजिबात?"
" नाही गं येतात की आठवड्यात एक दोनदा, कधी कधी जेवायलाही थांबतात. आम्हालाही बोलावतात जातो आम्ही पण. तिकडे गेल्यावर मला एकही काम नाही करू देत ती". "पण घर तर तुटलंच ना गं? मीनाक्षी, आम्ही तरी दोघे आहोत एकमेकांना साथ द्यायला तू तर एकटीच आहेस. नैनाचं लग्न होईल तेव्हा तू काय करशील गं? एकटी पडशील बघ खूप." प्रज्ञा ने तिची भीती बोलून दाखवली.
मी बोलले, " नैना च लग्न हे एकच स्वप्न राहिलेय बघ. तिचं लग्न झाल्यावर मी एकटी होईल, ही भीती माझ्या आधी माझ्या लेकीने ओळखलीय. लग्नानंतर मी तिच्यासोबत राहील.अगदी घरात नाही पण घराशेजारीच राहील जास्त लांब नाही जेणेकरून तिची आणि माझी  रोज भेट होईल. अशी अट ठेवलीय माझ्या लेकीने. एकवेळ ती मुलगा काळा, गोरा, गरीब, श्रीमंत हे पाहत नाहीए, पण ही अट मान्य असेल तरच मुलाला भेटते. खरंच आपलेच लेकरं आपला एव्हडा विचार करतात हे ऐकून बरं वाटतं.
या गोष्टीचा कधी कधी त्रास पण होतो. कारण आपला समाज अजून तेव्हडा पुढारला नाहीए.अशी स्थळ फार कमी येतात.असो, ती रेडी नसेल तोपर्यंत मी तरी तिला जबरदस्ती करणार नाहीए."
माझ्या लेकीचं माझ्यावरच प्रेम पाहून प्रज्ञा मनोमन सुखावली आणि गंमतीत म्हणाली," एक चान्स घेऊन मुलगी होऊ द्यायला पाहिजे होती." :) :) तसे आम्ही सगळेच हसलो.
" नाही गं मुली खरंच खूप काळजी घेतात आई वडिलांची, तसे मुलं कमीच घेतात मी तर म्हणेल, घेतच नाहीत बायको आली की गेले तिच्या मागे." प्रज्ञा 
आम्ही एवढ्या गप्पा मारतोय पण या सगळ्यात रेवा मात्र काहीच बोलली नव्हती.
मीच रेवाला म्हणाले, " काय हो मॅडम काय झालं? जेवण अंगी लागलेय का? काहीच का बोलत नाहीहेत? की येणाऱ्या सुनेची आधीपासूनच भीती वाटू लागलीय? "
तशी रेवा बोलली," नाही गं, अनुराग च लग्न ठरवायच्या आधीच मी एक निर्णय घेतलाय."

रेवाने सुनेचा आणि लेकाचा काय निर्णय घेतलाय पाहूया पुढच्या भागात.
तोपर्यंत कळूद्या तुमच्या प्रतिक्रिया.
मंडळी कोणाला काही अनुभव व्यक्त करायचे असतील किंवा अजून काही गोष्टी या कथेतल्या तुम्हाला तुमच्या वाटतं असतील तर कृपया कंमेंट करा आणि कळवा.

                                 @ किर्ती कुलकर्णी.

Friday, 24 April 2020

तिच्यातली ती!!! भाग १

तिच्यातली ती!!!

भाग १

       आज मला रेवाचा कॉल आला. खूप खुश होती तिने सांगितले कि अनुराग च लग्न ठरलेय.रेवाचा च प्रोमोशन होणार होत ती आता सासू होणार होती.
बऱ्याच वेळ गप्पा झाल्या आमच्या खूप दिवसांनी एव्हडं मनमोकळं बोललो होतो.नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही प्रद्ज्ञानालाही कॉल वर घेतले बोलता बोलता तिघीही इमोशनल झालो होतो. जवळ जवळ अर्धा तास बोलल्यावर रेवा सोबत रविवारी खरेदीला येऊ या प्रॉमिस वर आमचा कॉल थांबला. कॉल तर ठेवला पण माझं मन मात्र तीस वर्ष मागे गेलं.
मी मीनाक्षी जवळकर लग्न झालं तेव्हा तेव्हा अठरा वीस वर्षाची असेल, यशवंत देशमुख यांच्याशी लग्न झाले , आणि मीनाक्षी जवळकर ची मीनाक्षी देशमुख झाली.सतारीहून तिची कोल्हापूर ला रवानगी झाली.
लग्नानंतर सासू ,सासरे,आजेसासू, एक नणंद,नवरा असा सगळं परिवार.बडे घराणे होते, थाटही तसाच होता.नवरा नौकरीनिमित्त बाहेर जाऊन येऊन असायचा.खूप स्वप्न घेऊन लग्न केले होते हे असे असेल ते तसे असेल पण लग्नानंतर सगळ्यांचे मन संभाळण्यातच दिवस जाऊ लागले.
त्या घरात रुळताना शेजारी पजऱ्यांशीही जुळवून घेतले जाऊ लागले. आणि अश्यातच शेजारच्या आणा काका च्या घरी म्हणजे अण्णाभाऊ पाटील यांच्या घरात सुनेने म्हणजे रेवा ने पाऊल टाकले व सहा महिन्यातच समोरच्या घोरपडे काकूंनीही आपल्याला धाकट्या मुलाचे हात प्रज्ञा सोबत पिवळे केले.या सगळ्या मुळे आमच्या तिघींचे सगळे पहिले सण एकत्रच साजरे होत होते.आणि आमची मैत्री होत होती.घोरपडेंची प्रज्ञा,पाटीलची रेवा आणि देशमुखांची मीनाक्षी असे आमचे त्रिकुट जुळले.
किती गोड़ होती रेवा लुकडी सुकडी पण तेज होत चेहऱ्यावर.आणि प्रज्ञा थोडीशी स्थूल पण चंचल आणि प्रचंड हुशार.त्या दोघींच्या ही माहेरी बरीच श्रीमंती होती.
 तेव्हड्यात शांती ने घराची घंटी वाजवली आणि माझी आठवणींची तार तुटली.आल्याआल्या बडबडणारी शांती आज अगदीच शांततेत किचेन मध्ये गेली आणि यंत्रवत पणे काम करू लागली. रोज बोलणार माणूस बोललं नाही कि करमत नाही पण, मग मीच विचारले, "काय झाले ग आज एव्हडी शांत का?" ती म्हणाली काही नाही असाच, थोडा मूड नाही वाटतेय. पण मानसशात्र शिकलेल्या मुलीची आई होते मी थोडासा मलाही जमू लागलं होत. अलगद तिच्या पाठीवर हात ठेवला आणि मायेने विचारले काही खुपत असेल तर सांग.तशी शांती रडू लागली, " तिने पाठीवरचे आणि पायावरची वळ दाखवले, मारलं होत तिला नवऱ्याने आणि सासूने. नवऱ्याने संशयावरून आणि सासू ने उलट बोलली म्हणून."कसे तरी तिला समजावून पोलीस मदत करतात वेगैरे गोष्टी सांगून शांत केले.तिने चहा घेतला आणि गेली ती पुढच्या घरी कामाला.
शांती च्या वळांनी मला अजून एक खूप अवघड सत्य दाखवले समाजाचे आणि माझे डोळे क्षणभर का होईना पाणावले.
घरातलं काम वारल्यावर मोबाईल हातात घेतला रेवाने आमच्या ग्रुप वर सारी, दागिने यांचे फोटो पाठवले होते. त्यात अनुराग आणि त्याची होणारी बायको अनुष्का यांचाही फोटो टाकला होता.जोडी अगदी छान दिसत होती.अनुष्का सालस वाटत होती फोटो मध्ये तरी. अनुराग च्या लग्नाने आमच्या गृप ला बहार आणला होता. रेवा तर जणू हवेतच होती. या सगळ्या गप्पा गोष्टीत प्रज्ञा ने एक खूप जुना आमच्या तिघींचा फोटो टाकला होता. किती वेगळ्या होतो आम्ही बालिशच वाटत होतो खरचं वर्ष, कशी फुर्र्कन उडतात ना.त्या फोटो मध्ये आमच्या आमच्या सासू बाई पण होत्याच.त्याही किती वेगळ्या होत्या.आता मात्र तो फुटला ऐट सगळं उतरला होता.
बघता बघता रविवार आला मी प्रज्ञा आणि रेवा एका कॉमन पॉईंट ला भेटून पुढे निघालो. मनसोक्त खरेदी केली आणि निवांत येऊन माझ्या घरी बसलो असंही मी आणि माझी मुलगी नैना सोडून कोणी नसतंच त्यात ती पण मानसोपचाराची वोर्कशॉप घेण्यासाठी मुंबई ला गेली होती दोन दिवसांनी येणार होती. त्यामुळे त्या दोघींना मी त्यादिवशी राहण्याचा आग्रहाचं केला.आणि तो त्यांनी मान्य पण केला. खूप दिवसांनी आम्ही आमचा वेळ घालवणार होतो काही जुन्या आठवणीला उजाळा तर भविष्याचा तारतम्य लावणार होतो.
घरात माझ्या नवऱ्याचा फोटो पाहून प्रज्ञा मला म्हणाली," पंधरा वर्ष झाले ना ग भाऊजींना जाऊन ?, खूप धीरानं घेतलास बाई तू. वयाच्या सहावीसाव्या वर्षी तुझी साथ सुटली हातात तीन वर्षाच्या मुलीसहीत. घराची लोक अशी तुझ्या जागी दुसरा कोणी असत तर खचलं असत पण तू तर मोठी झालीसच घरालाही  सांभाळलस आणि लेकीलाही तिच्या पायावर उभं केलास कौतुक करावं तेवढ कमी आहे तुझं." तिच्या शब्दात रेवाने री ओढली ," लग्न झालं तेव्हा आजेसासू सहित सगळे होते.किती बोलायच्या त्या बघितलंय आम्ही.एक किस्सा तर अजूनही आठवतो मला तुझ्या नणंदेला चकली चे डोहाळे लागले होते आणि म्हणून तू बनवत  होतीस आणि तुझ्याकडून चकल्या लाल झाल्या म्हणून त्या चकल्या संपेपर्यंत त्यांनी तुला जेवण दिले नव्हते फक्त त्या चकल्या खायला लावल्या होत्या.आणि  हे पाहून या प्रज्ञा ने चोरून भात वरण आणलं तर तिला तिच्या सासू ने उपाशी ठेवले होते. आमच्या हि घरी काय वेगळं वार नव्हतं म्हणा,सगळं जेवणाचं माप त्यांनीच काढून देऊन उरल तरी ओरडायचं आणि कमी पडलं तू आव बरकती आहेस म्हणायचं दोन्ही कडून टाळ तेच वाजवणार."
"खरे आहे, पण हे गेल्यावर घराला कळाच गेली सहा महिन्याच्या फरकाने सासरेही गेले आणि येऊन ठेवले सगळे आमच्या डोकयावर. सासू, आजेसासू आणि नैना. घराची परिस्थिती बरी होती म्हणून बरंय.जेव्हडा शिकले होते त्या जोरावर नौकरी मिळाली. आणि हळू हळू आलं सगळं रुळावर. तेव्हा समजलं घरातले फक्त पुरुषाचं नाही स्त्री पण खंबीर आणि पायावर उभी असणं किती महत्वाचे आहे. म्हणून तर अडाणी, सोडलेल्या किंवा कोणत्या तरी अत्याचाराला बळी पडलेल्या साठी मी आश्रम चालू करू शकले.आपण जे भोगलं ते परत कोणी भोगू नये म्हणून. मरताना आजे सासू नेही कौतुक केलं."मी
यावर प्रज्ञा थोडी हसली आणि बोलली," तू जे भोगलं त्यासाठी आश्रम काढून तू सिद्ध झालीस का? आपण जे भोगलेय कोणी तीन दिवस जेवलो नाही, कोणी मार खाल्लाय, कोणी कारण नसताना शिक्षण सोडलंय, कोणी संशयाला बळी पडलेय, कोणाला माहेरच्यांना उगाच दिलेल्या शिव्या ऐकाव्या लागल्यात, माहेरून अवाजवी केलेल्या मागण्या पाहाव्या लागल्यात, या सगळ्यामध्ये हरवलेले त्यांचे दिवस त्यांचे स्वप्न कोणी भरून काढू शकत का?" प्रज्ञा बोलली.
"वीस ऐककवीस वर्षच्या पोरी होतो आपण खरंच लग्नाची अक्कल होती का ग आपल्याला?कधी कधी वाटत आत्ताच्या पिढीत जन्माला यायला हवे होते. स्पष्ट बोलण्याचा आत्मविश्वास तरी असला असता. काय चुकीचं आहे काय बरोबर आहे हे समजण्याचा तरी अक्कल असली असती.काही नाही तर कोणाशी लग्न होतेय त्याला समजून घेण्याचा आणि मनाची तयारी करण्याची तरी संधी मिळाली असती.आणि याउपर काही झालेच असते तर न्यायालय पोलीस यांची मदत तरी मिळाली असती" प्रज्ञा
" अगं असा काही नाहीए आत्ताही होतो सासुरवास फक्त पद्धत बदलीय.आपल्याला शारीरिक त्रास द्यायचे आत्ता मानसिक त्रासच प्रमाण वाढलेय.आश्या पद्धतीत छळ केला जातो ज्यात छळ, छळ वाटतच नाही पण असतो तर खरा.आत्ता कोणी उपाशी नाही ठेवत पण जे हवं ते खाऊही नाही देत.खूप मुली आजकाल नौकरी करतात पण खरंच ते सोपं असत का? बाहेरच करून घरात सगळं कारण सोपं असत का? परत सासू ने परंपरेच्या नावाखाली घातलेले काही ना काही टुमणे असतेच. कुठे पौर्णिमा, कुठे अमावास्या त्यादिवशी जर त्या पोरीला सुट्टी नाही मिळाली किंवा तिला घरी येऊन हे करायला नाही जमले तर आहेच परत शब्दरूपी बाण." मी
"अगं पण आजकाल मुली एकत्र राहतातच कुठे? आता माझीच सून घे राहतेय आमच्या जवळ? लग्नानंतर दोन महिन्यात वेगळी राहिली ग तोडलं माझ्या मुलाला माझ्या पासून?" प्रज्ञा
प्रज्ञाच नेमकं दुखणं मला आणि रेवाला समजलं होत.थोडासा काय ते म्हणता ना ब्रेन वॉश त्याची गरज होती पण त्याआधी गरज होती ती पोटोबाची.सगळ्याच दमलो होतो म्हणून स्वीगी च केलं.फ्रेश होऊन आवरलं तोपर्यंत पार्सल आले पण.
तिघींनीही आलेल्या जिन्नसावर ताव मारला आणि येऊन बसलो मागच्या अंगणात.
क्रमशः

Friday, 17 April 2020

नात्याचा परीघ ! भाग २ :


नात्याचा परीघ !
भाग २ :

निलेश ने प्रीतीला खांद्याला हलवून विचारले, "काय आहे हे? तू पूर्वा ला आदी का म्हणतेयस? कोण आहे आदी? काय झालेय माझ्या पूर्वा ला? "
प्रीती ने निलेश ला दिवाणखान्यात आणले आणि कहाणी चालू केली.
"निलेश तुला आठवत ? आपण एकाच कंपनीमध्ये आपलं जॉब चालू केला होता.induction training ला आपली भेट झाली.आपली चांगली मैत्री झाली होती. त्यानंतर काही activities मध्ये आपण एकत्र होतो.
आठवड्यात दोन वेळेसच तू आमच्या टीम ला meeting निमित्त यायचास ,पण एक वेगळं नातं तयार होत होत. मी मंगळवार आणि शुक्रवार येण्याची वाटच पाहत असायचे. एकदा तुझ्याही डोळ्यात मला माझ्यासाठी माझ्यासारखाच भाव दिसला मला वाटलं तू पण माझा विचार करतोस.
काही दिवस असेच गेले मी तुझ्यात गुंतत चालले होते.तुझ्याशी बोलण्याचे बहाणे शोधात होते.पण मला माझ्या priorities अडवत होत्या.घरातल्या जबाबदाऱ्या, स्वतःचे पाहिलेले स्वप्न या सगळ्यासाठी मला वेळ पाहिजे होता.
पण दुसरीकडे तुझ्यात गुंतणही वाढलं होत.तुझ्या बरोबर फक्त वेळ घालवण्यासाठी तू ज्या गोष्टींमध्ये असायचास तिथे सगळीकडे असण्याचा प्रयत्न मी करत होते.तुला आठवत HR ला कॉल करून मी अचानक सांगितलं होत मी पण येतेय ऑफिस च्या सहलीला कारण मला कुठूनतरी कळलं होत तू येतोयस त्या बस मध्ये.शेवटी माझं मन माझ्या डोक्यावर हरलं होत, आणि मानाने ठरवलं कि आता ता येऊन विचारायचेच " माझ्याशी लग्न करशील?"
आत्ताही आठवते मला ती तारीख ७ एप्रिल मी ठरवलं होत तुला विचारायचं ७ एप्रिल ला गुरुवार होता.दुसरे दिवशी तू येणार होतास तू आलास कि तुला coffe  साठी विचारायचे आणि तिथेच माझ्या मनातल्या भावना तुझ्याजवळ व्यक्त करायच्या.
दुसरे दिवशी मी थोडं स्वतःला नीट आवरून, सावरून आले होते.सकाळचे दहा वाजले तरी तू आमच्या टीम मध्ये आलाच नाहीस. ऍडमिन ला विचारले तर तिने सांगितले तू आज येणार नाहीस.
थोडासा हिरमोस झाला माझा पण विचार केला ठीक आहे मंगळवारी सांगू."
निलेश च्या चेहऱ्यवाराचे भाव भरभर बदलत होते.आश्चर्य, तिरस्कार हतबलता सगळं त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.प्रीती मात्र शांत होती.ज्याच्यासाठी ती एव्हडी इमोशनल होती तो समोर असून ती एव्हडी शांत होती निलेश च्या मनात नकळत शंका अली.
प्रितीने पाणी घेऊन पुढे चालू केले, " शुक्रवार गेला शनिवारी मी आशु ला फोन केला.आठवते तुला आशु? वरच्या टीम मध्ये होती.तिच्याशी बोलताना कळले कि शुक्रवारी ८ एप्रिल ला, तुझी पूर्वा नावाच्या मुलीसोबत एंगेजमेंट झाली आहे ".
"खरं सांगते पायाखालची जमीन सरकली होती ,पहिल्यांदा देवाला प्रतिप्रश्न केले होते.का माझे प्रेम असे तोडले? का तुझ्या जवळ येण्याआधीच तुझ्यापासून कायमचे लांब केले?"
"पण या सगळ्याचा काहीच उपयोग नव्हता आता. सगळं संपलं होत, तू कायमचा दुसऱ्या कोणाचा तरी झाला होतास."
"त्यानंतर एप्रिल ते डिसेंबर तुझं लग्न होईपर्यंत खूप वेळा वाटलं एकदा येऊन तुला सगळं सांगावं, पण १८ डिसेंबर पर्यंत कधीच हिम्मत नाही करू शकले.मी तुला कायमच गमावलं होत. मी तुझी असून कधीच तुझी  होऊ शकत नव्हते."
आता मात्र प्रीतीला अश्रू अनावर झाले होते.ती आत्ताही हमसून हमसून रडली.
निलेश ला हे सगळं धक्कादायक होत.पण पूर्वा चा विचार आला आणि तो बोलला,""पण हा आदी कोण आणि आता तो पूर्वा ला का त्रास देतोय?"
प्रीती बोलली , " आदी माझा नवरा आहे."
निलेश ने एकदम आश्चर्याने प्रीती कडे पहिले.
"हो निलेश माझा नवरा आहे. तुझं आणि पूर्वा च लग्न झालं आणि तुम्ही हैद्राबाद शिफ्ट झालात.तुझ्या बाहेर यायला मला दोन वर्ष लागले.खरं किती बाहेर आले होते यावरही शंकाच आहे म्हणा."
"असो , मला डायरी लिहायची सवय होती. आणि मला माझ्या या भावना डायरी शिवाय कोणालाही सांगता येणार नव्हत्या." " मी डायरी मध्ये सगळं लिहाल होत. आपल्या काही आठवणी म्हण ना."
" तीन वर्षाने माझं लग्न झालं. आदिराज इनामदार त्याच नाव, श्रीमंत ,दिसायला देखणा आणि मेन म्हणजे त्याने माझ्या सगळ्या अटी मान्य केल्या होत्या."
"लग्नाला कोणत्याच तोंडाने नाही म्हणू शकत नव्हते.तू तुझ्या संसारात रमला होतास.तुला मुलगी झाल्याचंही fb ने सांगितलं होत."
"लग्नाला दोन महिने पूर्ण झाले होते.स्वप्नवत होत सगळं.बडे लोक होते पण माणुसकीला धरून होते.एकाच प्रॉब्लेम होता तो म्हणजे आदिराज चा स्वभाव,विचित्र नाही म्हणता येणार पण थोडा संशयी. लग्नानंतरही मी नोकरी चालूच ठेवली होती,नंतर मला कळले कि आदी रोज माझा पाठलाग करतो ऑफिस पर्यंत, पण मी लक्ष नाही दिल हे समजून कि arrange marriage आहे थोडा वेळ लागेल विश्वास यायला."
"काही दिवसांनी आई च्या घरून माझे काही बुक्स आणायचे होते, त्यामुळे मी आणि आदी गेलो होतो. त्या बुक्स बरोबर माझी ती डायरी हि आली ज्यामध्ये आपल्या गोष्टी होत्या." 
"एकदा मी ओफिस ला गेलेले असताना आदी ने माझी डायरी वाचली आणि सगळंच बदललं. मला त्याची सतत टोमणे गिरी , सतत किरकिर एकदातरी त्याने हात उचलला माझ्यावर. त्याला सतत असा वाटायचं कि मी त्याच्यावर प्रेम नाही करत"." आमच्यातली वाद कमी व्हावेत म्हणून आमच्या घरच्यांनी आम्हाला या घरात राहायला पाठवलं.त्यांना वाटलं कि आम्हाला एकांत मिळेल इथे आल्यावर , खरंच एकांत मिळालं आमच्या भांडणाला , फक्त आदीच चुकला असा नाहीए कदाचित मी पण चुकले मगच सगळं विसरून मी आदींवर एकदा प्रेम करून तरी पाहायला हवं होत.आत्तापर्यंत बेड रूम मध्ये होत असलेली भांडणे आता घरात होऊ लागली.आणि अश्यातच या जिन्यावरून पडून आदींचा अंत झाला.मारताना तो एकाच गोष्ट बोलला ज्याने माझी बायको माझी होऊ दिली नाही त्याला त्याची बायको मी देणार नाही.तेव्हा पासून मला पूर्वा ची काळजी वाटत होती.भीती वाटत होती कि तो मेल्यानंतर काही करणार तर नाही ना? आणि माझी ही भीती जास्तच वाढली जेव्हा मी पूर्वा आणि तुला इथे राहायला आलेलं पाहिलं."
"तेव्हाच लक्षात आलं होत हे तुमचं नशीब नाही तर आदिराज ची शक्ती आहे ती तुम्हाला इथे घेऊन आली आहे,आणि तेव्हाच ठरवलं काहीही झालं तरी तुझ्या नात्याचा परीघ बिघडू द्यायचा नाही."
आता मात्र निलेश पुरता घाबरला होता कारण कोणता रोग असता तर डॉक्टर ला दाखवलं असत, पण मेलेल्या माणसाशी कसं लढणार ?त्याच हि भीती प्रीती ने ओळखली. 
निलेश ने प्रीतीला विचारले पण आम्ही इथे राहायला आल्यानंतर दोन तीन महिन्याने आम्हाला त्रास चालू झाला, त्याआधी कधी काही जाणवलं देखील नाही असा कसं?
प्रीती ने सांगितलं "तुम्ही राहायला आले तेव्हा तुमचे वडिलोपार्जित देव बरोबर घेऊन आलात आणि पूर्वा खूप मनोभावे त्याचे पूजन करायची, पण त्यादिवशी नुपुरा खेळात मागच्या अंगणात गेली आणि तिने खेळता खेळता मागच्या अंगणात ठेवलेला मारुती पालथा केला ज्यामुळे आदी च्या भुताला त्याच तोंड दिसत नाहीए.
दुसरेदिवशी पूर्वा ने पूजा नाही केली आणि तो तिच्यावर काबू करू शकला."
"माझ्या पूर्वा ला यातून सोडवायचय मला, मी काय करू शकतो?" निलेश डोक्याला हात लावत खाली बसला  व प्रीतीला बोलू लागला.
निलेश च पूर्वा वॉर प्रेम पाहून प्रीतीला पुन्हा भरून आले पण स्वतःला सावरत ती बोलली मी आणेल तुझ्या पूर्वा ला यातून सोडवून.
असा बोलून प्रीती निलेश ला सांगून गेली कि काहीही झालं तरी नूपुरला तिच्या खोलीच्या बाहेर येऊ देऊ नकोस आणि अंगणातला मारुती सरळ कर देवाचा धावा कर विश्वास ठेव पूर्वा फक्त तुझी आहे आणि तुझीच राहील.
आता घरात निलेश एकटाच होता सकाळ होत आली होती.निलेश ने नूपुरला फ्रेश केले जेवू घातले आणि इथेच खेळवत बसला पण लक्ष मात्र पूर्वा कडे लागले होते.मनातल्यामनात देवाचा आई वडिलांचा धावा चालूच होता.
साधारण अकरा वाजता प्रीती परत आली.थोडीशी घाबरलेली होती.तिने सांगितले कि नुपुरा ला आपल्याला घरात ठेवून नाही चालणार तिला कुठेतरी संरक्षित जागी न्यावे लागेल.
पण हे तिच्यासाठी का सुरक्षित नाहीए?
या सगळ्याचे उत्तर देण्याची ही वेळ नाहीए तिला कुठंतरी सोड जिथे ती सुरक्षित राहील.
या सगळ्यामध्ये निलेश ला फक्त श्याम काका आठवले जे नुपूराला सुरक्षेत ठेवतील.निलेश ने लगेच त्यांना कॉल केला ते पण थोड्याच वेळात पोहचले. निलेश ने त्यांना सगळं सांगितलं आणि नुपूराला सोबत घेऊन जाण्याची विनंती केली.
श्याम काका खरंच कृष्णासारखे धावून आले होते ते लगेच तयार झाले.ते बोलले मी तिला आपल्या घरातल्या देवघरात नेऊन खेळवतो त्या पेक्षा कोणती जागा सुरक्षित असेल?
तिथे देवाचे तर आहेतच तिच्या आजी आजोबांचे पण आशीर्वाद आहेत.
निलेश ला त्यांचे बोलणे खूप जिव्हाळ्याचे वाटले, वाटलं आई बाबाच त्यांच्या रूपात आहेत.
श्याम काका नुपूराला घेऊन गेले जाताना काळजी घ्या लवकर या पोरगी, म्या, आई बाबा वाट पाहतायत हे लक्षात ठेवा असे सांगून गेले.
आता सुरवात होती पूर्वा ला वाचवायची, प्रीती ने पूर्ण तयारी केली होती.
वाट पाहत होते ते आदींच्या येण्याची म्हणजेच पूर्वा च्या उठण्याची.
साधारण रात्री चे बारा वाजत असतील, पूर्वा उठली पण नॉर्मल होती तिचे वागणेच कळेना. तिने उठून निलेश ला विचारले हि कोण?
निलेश ने सांगितले ही माझी मैत्रीण प्रीती!
पूर्वा ने तिचे हसत स्वागत केले आणि बोलली भूक लागली आहे मी काहीतरी खायला आणते आणि किचेन कडे वळली.
प्रीती आणि निलेश ला काहीच उमगेना हे काय होतेय त्यांची अपेक्षा होती पूर्वा उठेल ओरडेल तो आदी तिच्यामध्ये तिला त्रास देईल.पण असे काहीच घडले नव्हते.
पूर्वा किचेन कडे वळली पण किचेन मध्ये जाऊच शकली नाही कारण मधेच देवघर होत आणि देवघरात वडिलोपार्जित आशीर्वाद होते.
तसं पूर्वा चा पार चढला.ती तिथून आली ते डायरेक्ट प्रीतीवर वार करू लागली तिने प्रीतीची मुंडी धरली आणि ओरडली तू तू आणलं होतास ना त्या श्याम्याला इथे? तो आलं येताना त्या थेटक्यांचे हार घेऊन आला.कालच तुला संपवायला हवं होत.
निलेश ला काहीही सुचत नव्हतं त्याने देवघराकडे पाहिलं तर तिथे आई बाबांच्या फोटोचा हार होता.नंतर त्याच्या लक्षात आला निघताना नुपूराला देवाच्या पाय पडवतो म्हणून ते गेले होते तेव्हा त्यांनी ठेवला.
निलेश ने पूर्वा ला मागून गच्च धरले आणि जोरात बोलला, "ओम नमः शिवाय !"
तशी पूर्वा ने प्रीतीला लांब केले,आणि निलेश वर उडी घेतली. पूर्वा ने निलेश ला खाली पाडले व बोलू लागली तू मला मारणार मला?
"चल, मी सांगते तुला मी कसं मारेल ते माझ्या अंगावर देव पूजेचं पाणी पडलं मी तुझ्या बायकोच्या शरीरात असताना तर मी जाळून मरेल पण पूजा करणार कोण तू कि ही प्रीती?" असा बोलून पूर्वा भेसूर हसू लागली.
निलेश ने विव्हळत प्रीतीला विनंती केली कि जा आणि पूजा कर पण प्रीती ढिम्म सारखी तिथे बसून राहिली.
निलेश ओरडत होता पण ती तसूभरही हालत नव्हती.निलेश च्या विव्हळण्याने पूर्वा मात्र खुश होत होती.
आता ती निलेश च्या अंगावर बसून ववेडेवाकडे चाळे करू लागली त्याच्या पोटावर तबला वाजवू लागली आणि म्हणत होती माझी बायको मला मिळाली नाही तुला तुझी मिळणार नाही.
निलेश ला प्रीती चे नवल वाटत होते ती का काहीच करत नव्हती?
एवढ्यात समोरचे दार तोडले गेले आणि दोन चार साधू घरात आले त्यांनी त्यांच्या कमंडलूतलं पाणी पूर्वा आणि निलेश च्या अंगावर टाकले तसे पूर्वा जोरात ओरडत जमिनीवर लोळू लागली.
निलेश त्याच्या तावडीतून सुटला होता.तो उठून पूर्वा जवळ गेला त्याने तिला जवळ घेतले.तोंडावर पाणी मारून उठवले, तिला शुद्ध आली तशी ती रडू लागली तिला त्रास होत होता.त्याने तिला उठवून बेडरूम मध्ये झोपवले ती शांत झाली आहे आणि सगळं ठीक आहे कळल्यावर तो बाहेर आला त्याने त्या साधकांना बसवून पाणी दिले.आणि प्रीतीला ओरडू लागला का हलली नाहीस? का पूजा केली नाहीस? हे साधक वेळेवर आले नसते तर काय?
पण ती मात्र निश्चल तशीच होती.साधक बोलले, "बाळा तू कोणाशी बोलत आहेस? इथे कोणीच नाहीए."
तास निलेश घाबरला तो प्रीतीकडे बोट दाखवून बोलला अहो हि इथे बसलीय ना ती मुलगी माझी मैत्रीण आहे.
साधक बोलले," बाळा इथे कोणीच नाहीए. आम्ही साधनेला बसलो होतो एका मुलीने आमच्या कुटीबाहेर येऊन आम्हाला विनंती केली कि या घरात काहीतरी विघटीत होतेय तुम्ही लवकर या, म्हणून आम्ही आलो आणि आल्यावर लगेच आम्हाला कळलं काय चालू होत ते.आमचं काम झालं आहे आम्ही निघतो."
हा सगळं प्रकार निलेश च्या डोक्याबाहेर जात होता, साधक निघत होते एवढ्यात त्याने त्यांना थांबवलं आणि आपला लॅपटॉप घेऊन आला त्यामध्ये काही जुने फोटोज  होते, त्यातला प्रीती चा फोटो ओपन करून विचारले हि मुलगी होती का ती?"
साधकांनी हो असे उत्तर दिले.हे ऐकून निलेश मात्र पुरता हादरला होता.त्याला काहीच सुचत नव्हते. त्याने मागे वळून पहिले तर प्रीती तिथे नव्हती.त्याने पूर्ण घर शोधले प्रीतीला पण ती कुठेच नव्हती.
या सगळ्यात पाहत कधी झाली कळलंच नाही.
सगळ्याच विचार करता करता निलेश ला सोफ्यावरच झोप लागली.सकाळी सात ला पूर्वा च्या आवाजाने त्याला जाग आली ती खाली आली होती बरीच फ्रेश वाटत होती.तिने निलेश ला उठवले आणि नुपूराला उठवण्यासाठी तिच्या रूम कडे जात होती, निलेश ने तिला अडवले आणि सांगतले कि नुपुरा श्याम काका कडे गेली आहे. पूर्वा ला काहीच आठवत नव्हते. निलेश ने पूर्वा ला मिठी मारली  आणि बोलला, " trust me!, असे बोलून त्याने तिला सगळं सांगायला सुरवात केली. प्रीती कुठे गेली ते कळले नाही हे ही तो बोलला आणि तो त्याच्या बेस्ट friend  जवळ मनमोकळं बोलला "
निलेश पूर्वा दोघेही तयार होऊन , श्याम काकांकडे जायला निघाले.
बाहेर पाडले एवढ्यात शेजारचे एक आजोबा आले आणि बोलले " एक सांगायचं होत, तुम्ही हे घर सोडा इथे एक नवीन तरुण जोडपं राहत होत, त्या माणसाचा इथेको मृत्य झाला होता आणि त्याच्या बायकोचाही इथे मृत्य झाला पण ती कशी मेली कोणालाच नाही माहित. तुम्ही भले लोक वाटता म्हणून सांगितलं हे घर सोडा नका राहू इथे."
हे ऐकल्यावर  निलेश पूर्वा च्या डोक्यात पाल चुकचीकली. निलेश ने त्या आजोबांना प्रीती चा फोटो दाखवला आणि विचारलं ही होती का त्या मेलेल्या माणसाची बायको? त्या आजोबांनी हो अशी मान डोलावली आणि निलेश ला अश्रू अनावर झाले.
त्याला तिचे पुन्हा पुन्हा तेच शब्द आठवू लागले ,"मी तुझ्या नात्याचा परीघ नाही बिघडू देणार."
आत्ता निलेश ला तिच्या वागण्याचा अर्थ कळत होता, तीच श्याम काकांकडे गेली नुपुरा च्या काळजीने तिनेच त्यांना बोलावलं, ती माणूस योनीत नव्हतीच म्हणून ती देवाची पूजा नाही करू शकली पण तिने त्या साधकांना सांगून निलेश ची पूर्ण मदत केली,कदाचित आदिराज असा करणार हे माहित असेल म्हणून मेल्यावरही ती मुक्त नाही झाली.हे प्रेम होत तीच निलेश वरच की माणुसकी होती?
खरंच देवाला प्रीती आणि निलेश ला भेटवायचं नव्हतं की प्रत्येक प्रेमाचा अंत लग्न होत नाही हे सांगायचं होत?
निलेश आणि पूर्वा ने मनोमन प्रीती चे धन्यवाद दिले आणि आपल्या लाडक्या लेकीला आणायला, आई बाबांचे आशीर्वाद घ्यायला मार्गी लागले.

                                                     @ किर्ती कुलकर्णी 

मित्रांनो कशी वाटली काठ please कळवा!

परीघ नात्याचा ! भाग १ :

परीघ नात्याचा !
भाग १ :

निलेश , पूर्वा आणि नुपुरा लोहगाव विमानतळावर उतरले आहेत.
निलेश च्या नवीन कंपनीने त्यांना घेण्यासाठी गाडी पाठवली होती पण निलेश ला नवीन घरात जाण्याआधी आई वडिलांच्या जुन्या घरात जायचं होत. काही गोष्टी होत्या ज्या त्याला पूर्वा ला सांगायच्या होत्या.काही आठवणीत थोडा वेळ रमायचं होत. नुपुरा तर पहिल्यांदीच आजी आजोबांच्या घरी जाणार होती.
त्यांची कॅब कोथरूड च्या एका प्रशस्त घरासमोर येऊन थांबली तसे घर देखरेखीसाठी ठेवलेले श्याम काका   बाहेर आले निलेश आणि पूर्वा ला पाहून त्यांनी आनंदाने त्यांचे स्वागत केले सामान घरात नेऊन त्यांच्यासाठी चहा ठेवला आणि जेवणाच्या व्यवस्थेसाठी निघून गेले.
निलेश आणि पूर्वा आपल्या जुन्या आठवणीत हरवले तर नुपुरा मात्र हे सगळं पाहण्यातच गुंग होती.नकळत पूर्वा बोलून गेली आज आई बाबा असते तर नुपुरा ला कुठे ठेवू आणि कुठे नाही असे केले असते. नकळत निलेश च्याही डोळ्यात पाणी तरळले.
निलेश पूर्वा नी आई बाबांच्या फोटोचा हार बदलला , दिवा लावला आणि २ वर्षाच्या आपल्या लेकीला आजी आजोबांच्या फोटोला नमस्कार करायला सांगितलं.
एवढ्यात निलेश ला नवीन कंपनीच्या मॅनेजर चा कॉल आला आणि निलेश बोलतच बाहेर गेला. पूर्वा मात्र सासूच्या प्रसन्न मुद्रा असलेल्या फोटोकडे पाहत राहिली .
निलेश पूर्वा ला आवाज देतच बाहेरूनच आत आला आणि बोलला चल आपल्याकडे वेळ कमी आहे तुला जे द्यायचंय ते देतो.दोघेही देवघरात आले निलेश ने एका लाल कपड्यात बांधलेले देव पूर्वा याच्या हातात दिले आणि बोलला आपल्या नवीन घरासाठी या घराचा आशीर्वाद.
श्याम काकाकडे जेवण करून दोघेही आपल्या नवीन घरी रवाना झाले..
पण असं म्हणतात ना "काही गोष्टींना तुम्ही सोडू शकत नाही आणि काही गोष्टी तुम्हाला सोडत नाहीत."

निलेश त्याच ऑफिस आणि नवीन काम यात कधी बिझी झाला त्यालाही कळलं नाही. पूर्वा आणि नुपुरा नवीन ठिकाणी रुळत होत्या.आजूबाजूचे लोकही चांगले होते. बघता बघता निलेश पूर्वा चा संसार पुण्यात बसला असं म्हणायला हरकत नव्हती.
पण या संसारात काहीतरी चुकत होत असायला होते हे तिघेच पण अजून कोणीतरी असल्याचं सारखं वाटायचं.निलेश कामामध्ये एव्हडा गाडून गेला कि तो पूर्वा आणि नुपुरा पासून लांब जातोय हे त्याला जाणवून घ्यालाही जमलं नाही.पूर्वा मात्र त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत होती असेल कामाचं टेन्शन, नसेल जमलं या गोष्टींनी स्वतःला बाकी गोष्टींमध्ये गुंतवत होती.
निलेश पूर्वा ची हि स्थिती असताना नुपुरा मात्र वेगळ्याच विश्वात असायची , खेळायची , बागडायची अशीच एकदा खेळता खेळता ती घराच्या मागच्या अंगणात गेली वेळ साधारण  संध्याकाळी सात ची असावी.पूर्वा किचन मध्ये कामात होती दिवा लावून मागच दार ती लावायचं विसरून गेली होती आणि त्याने याचाच फायदा घेतला होता.
थोड्या वेळाने पूर्वा ला नूपुरांची काहीच चालूल लागेना तेव्हा तिने सगळं घर शोधले पण नुपूर कुठेच सापडली नाही घाबरून तिने निलेश ला कॉल केला निलेश हि अर्धा तासात घरी पोहचला त्यानेही शोधले तोपर्यंत घराच्या आजूबाजूचे लोकही आले होते सगळे आपापल्या पद्धतीने शोधात होते पण काही फायदा झाला नाही.शेवटी काही लोकांनी पोलिसात जायचा सल्ला दिला. आणि एवढ्यात पूर्वा ला नूपुरच्या खोलीत काहीतरी जाणवले तसे ते दोघेही तिथे आले आणि पाहतात तर नुपूर झोपेतून जागी होत होती आणि रडत होती.पण हे सगळं पाहून निलेश आणि पूर्वा दोघेही पुरते चक्रावले होते कारण काहीच मिनिटांपूर्वी त्यांना ती तिथेच सापडली नव्हती.पण या सगळ्या प्रश्नांच्या आधी तीच रडणं शांत कारण महत्वाचं होत आणि तिला जेवण देणं. नूपुरला जेवू घालून झोपवले आणि ठरवले कि उद्या तिला सगळं विचारायचे पण भीतीही होती अडीच तीन वर्षाचं लेकरू ते काय सांगणार ? त्यादिवशी खूप दिवसांनी निलेश पूर्वा एकत्र जेवायला बसले. जेवण मात्र दोघांनाही गेलं नाही.
दुसरे दिवशी निलेश ने खास सुट्टी टाकली होती त्याने नुपूर बरोबर खूप वेळ घालवाल पण काही झालं तरी नुपूर त्याला हे सांगू शकली नव्हती कि अदालदिवशी रात्री कुठे गेली.
त्याचदिवशी संध्याकाळी बरोबर तिन्हीसांजेला पूर्वा ला नूपुरच्या खोलीत काहीतरी जाणवले, पूर्वा काय आहे ते पाहण्यासाठी खोलीत गेली व तिथेच भोवळ येऊन पडली. निलेश नुपूरांसोबत खेळून घरात येत असतानाच पूर्वा ला आवाज देत येत होता त्याने किचन मध्ये पहिले तिथे ती नव्हती त्याने पुन्हा एकदा आवाज देत हात पाय धुतले आणि नूपुरलाही फ्रेश केले. एवढे आवाज देऊनही काहीच रिस्पॉन्स नाही सो त्याने एक एक खोली पाहण्यासाठी आपल्या बेडरूम कडे जात होता तस त्याला नुपूरने ओढले आणि आपल्या खोली कडे बोट केले तो तिच्या खोलीत गेला तर पूर्वा तिथेच पडली होती.त्याने तिच्या डोक्यावर हात ठेऊन पहिले तर तिला खूप ताप होता.निलेश ने तिला आपल्या बेडरूम मध्ये आणले आणि डॉक्टर ला फोन केला.
आज दोन दिवस झाले होते पण पूर्वा चा ताप कमी नव्हता.निलेश ने पूर्वा च्या आईला बोलावून घेतले होते. कारण पूर्वा च आजारपण आणि नुपुरा दोघींना सांभाळणं त्याला अवघड होत होते.पण पूर्वा च्या आई ला यायला दोन चार दिवस लागणार होते कारण त्या आपल्या लोकांकडे सौदीला गेल्या होत्या.
डॉक्टर नी पूर्वा ला हॉस्पिटल मध्ये हलवावे लागेल असे सांगितले होते.निलेश पुरता अडकला होता पूर्वा ची अशी तब्बेत लहानगी नुपुरा.
निलेश डॉक्टर ला दारात सोडून परत येतच होता एवढ्यात दारावरची बेल वाजली. निलेश ने दार उघडले तर बाहेर प्रीती उभी होती. निलेश दोन मिनिट साठी सगळंच विसरला होता.आपली जुनी मैत्रीण अशी अचानक आपल्या दारात उभी पाहून तो पूर्ण भांबावला त्याला काहीच काळात नव्हतं नेमकं काय होतेय.तिनेच पुढाकार घेऊन म्हणलं, "आरे आत तरी बोलावशील कि नाही?"
तो भानावर येत," अरे ये ना ये"
ती आत येताच पूर्वा जोरात ओरडली तसा निलेश त्यांच्या रूम मध्ये पळाला. मात्र त्यामागे प्रीती गेली नाही.
निलेश पूर्वा च्या रूम मध्ये होता तोपर्यंत प्रीती मागच्या अंगणात गेली तिथे तिने एक लिंबू आणि भात गुलाल लावून ठेवला काहीबाही पुटपुटून ती आत गेली. इथे पूर्वा शांत झाली होती.
निलेश पुन्हा दिवाणखान्यात आला आणि प्रीती ला बोलला सॉरी मी तुला पाणीही नाही विचारले तशी प्रीती त्याला बोलली " इट्स ओके, काही प्रॉब्लेम आहे का? कोण ओरडलं?"
तस मागच्या चार दिवसांपासून चालू असलेला खेळ त्याने प्रीतीला सांगितलं.त्यातून त्याची होत असलेली फरपट तिला दिसली.
प्रीती ने त्याला विचारलं " तुझी हरकत नसेल तर तुझ्या सासूबाई पर्यंत मी इथे राहून तुला मदत करू का?"
निलेश ला तिचे हे शब्द खूप आधारवाने वाटले.
त्याच दिवशी प्रीती तिथे राहायला आली.पूर्वा च्या तब्बेतीत काहीच सुधारणा नव्हती , निलेश ने डॉक्टर आणि nurse  ना पण घरीच बोलावले होते.दिवसभर nurse पूर्वा सोबत असायच्या आणि रात्री घरी जायच्या
प्रीती आली त्या रात्री नुपुरा खूप किरकिर करत होती. प्रीती ने नुपूराला जवळ घेतले आणि झोपी घातले.
मध्य रात्रीची वेळ होती प्रीतीला पूर्वाच्या खोलीत काहीतरी जाणवले कोणीतरी पूर्वाला घेऊन जातेय असे.
प्रीती उठून पूर्वा जवळ गेली. प्रीती खोलीत जाताच ते जे काही होते ते खिडकीतून पळाले.असेच पुढची रात्रही झाले.आणि त्यानंतर मात्र ते जे काही होते त्याने प्रीतीवर घात केला.
प्रीती तिच्या खोलीत झोपली असताना तिच्यावर कोणीतरी येऊन बसले होते ते दुसरा कोणी नसून पूर्वा होती. पूर्वा प्रीतीला मारण्याच्या प्रयत्नात होती . पण प्रीती जोरात ओरडली "आदी नाही सोड, आदी सोड".
हे ऐकताच पूर्वा चवताळली आणि आणखीन जोरात प्रहार करू लागली.तसे प्रीती स्वतःला वाचवत बोलली " काय हवं आहे तुला ? का तिला त्रास देतोयस? का तिला शिक्षा देतोयस?"
तसे माणसाच्या आवाजात पूर्वा बोलू लागली " तिला नाही तिच्या नवऱ्याला त्याला त्रास द्यायचाय, फु..\ ने माझी बायको मला मिळू दिली नाही मग मी त्याची बायको घेऊन जाणार, आणि जोरात हसू लागला." हे सगळं चालू असताना निलेश ही तिथे आला.
"आदी सोड तिला तीची चूक नाही सोड तिला आदी" असा म्हणत प्रीती पूर्वाच्या गयावया करू लागली.
इकडे निलेश ला काहीच कळत नव्हते काय होतेय? प्रीती पूर्वा ला आदी का म्हणतेय ?
पूर्वा प्रीतीच्या समोर बसली तिने प्रीतीला हनुवटी पकडून चेहरा वरती केला आणि बोलली " तुला खूप पुळका आहे ना हिचा दोन दिवस आहेत तुझ्याकडे वाचावं हिला , नाही तर असं कर तो आहे ना निलेश कडे तोंड करत पूर्वा बोलत होती ,त्याने माझी बायको मला दिली नाही त्याचा जीव घे जा," आणि जोरात हसू लागली, लगेच त्यानंतर " वाचव वाचव असं विव्हळत पूर्वा पुन्हा रडू लागली आणि मधेच मोठ्याने हसली "
तशी पूर्वा जमिनीवर पडली प्रीती आणि निलेश ने तिला परत बेड वर झोपवले.
निलेश ने प्रीतीला खांद्याला हलवून विचारले, "काय आहे हे? तू पूर्वा ला आदी का म्हणतेयस? कोण आहे आदी? काय झालेय माझ्या पूर्वा ला? "
प्रीती ने निलेश ला दिवाणखान्यात आणले आणि कहाणी चालू केली.

क्रमशः 

Friday, 27 March 2020

बेस्ट देऊद्या !!

मान्य आहे तुला जे हवं ते मी देत नाहीए,
घरात डांबून मी ठेवतेय,
पण मला जे हवं होत ते तू दिलंस का?
एकदा विचार कर मला जे हवं होत ते तू दिलंस का?

नको होती मला धगधगती आग,
हिरव्या शालूत होती माझी आयुष्याची जाग,
नव्हते रे विषाचे द्रव्य,
नव्हते ते हानिकारक किरण,
नव्हते माझ्या पोटात mining  चे टोचणं,
नव्हते प्लास्टिक चे माझ्या पोटात सारण,
थंडगार पाण्याच्या सळसळत्या लाटा,
होत्या माझ्या नाभीत जीवजिवांच्या वाटा,
कशासाठी कोणासाठी पोखरले रे डोंगर,
ओरडले, चिडले मी रडले पण मग कोसळल्या दरड,
शांत माझी सरीता मर्यादेत वाहत होती,
तुम्ही घेतली तिची जागा मग ती चिडली,
तीच चिडणं कोणामुळे झालं?
खरंच तुम्ही जे केलं ते बरोबर केलं?
मान्य केलं मी ,खूप प्रगती केली तुम्ही,
पण मला त्रास देऊन,
माझ्या नाभीतून जन्म घेऊन मला त्रास दिला,
हिमालय माझा पुत्र त्यामुळेच रडू लागला,
आता मला माझा वेळ द्या,
माझा हिरवा शालू मला परत द्या,
मी तुमचीच आहे तुमच्याच साठी आहे,
फक्त एकदा मला आई म्हणून तुम्हाला बेस्ट देऊद्या !!

                                    @ किर्ती कुलकर्णी 

Wednesday, 29 January 2020

जिंदगी !!!!

जिंदगी एक पहेली हे साहब ,
उलझेंगे नहीं तो सुलझेंगे कैसे ?

                         @किर्ती कुलकर्णी

वो दास्ताँ तुम्हे बता दूँ !!!

लफ्जों से न कह सके,
वो दास्ताँ तुम्हे बता दूँ ,
हमारे इस दिल किं,
आवाज तुम तक पहुंचा दूँ,
बस हो गया अब वापस भी आ जाओ ,
ये जिंदगी जहन्नुम है तुम्हारे बिना,
ये बात तुम्हे बतला दूँ,
कुछ गलतियोंके शिकारी हम भी बने होंगे,
पर अब भी तुम्ही पे मरते है,
ये जिक्र तुम्ही से कर दूँ,
जो लफ्जों से न कह सके,
वो दास्ताँ तुम्हे बता दूँ !!

       I miss You Shree
                       @किर्ती कुलकर्णी 

Friday, 24 January 2020

चूक !!!!

चूक !!!!
चूक काहीतरी शिकवते,?
पण त्यापेक्षा जास्त हिरवते,
स्वतःची असो व दुसऱ्याची ,
शिक्षा मात्र सगळ्यांनाच देते,
एका क्षणाची सोबत करते,
पडसाद मात्र आयुष्यभर देते,
चूक एका क्षणात आयुष्य बिघडवते,
निराशा, आसू देऊन सुखाचे क्षण कायमसाठी घेऊन जाते,
चूक प्रत्येकाला आपला गुलाम बनवते,
पहिली चूक माफ असते म्हणतात,
खरंच का कोणी चूक मनातून माफ करतात?

                                     @ किर्ती कुलकर्णी