|| बाळंतविडा ||
काही महिन्यांपूर्वी माझी डिलिव्हरी झाली. मी आई झाले होते.आनंद गगनातमावत नव्हता.दवाखान्यातून घरी आणि मग माहेरी अशी माझी आणिबाळाची रवानगी झाली.
दिवसेंदिवस जात होते मी आणि बाळ दोघेही मोठे होत होतो.तो मलाओळखत होता आणि मी त्याला.आईच्या मालिश-अंघोळीने, नवनवीनपदार्थांच्या खान-पाण्याने दोघेही भरत होतो.बाळामध्ये आणि माझ्यामध्येआई मात्र मोठा दुआ झाली होती त्याच्या एका रडण्यावर तिला कळायचं कित्याला भूक लागलीये कि पोट दुखतंय.त्याच्या रडण्यावर उपाय काय हे पणतिला माहित असायचं.
आई ने समजावलं बाळ कसं रडलं कि काय करायचं? चेक पॉईंट्स दिले होते:).तिने समजावलं आई च दूध बाळाला किती महत्वाचं असत. दूध कमी होऊनये म्हणून काय काळजी घ्यायची.आई च्या काळजी नेच मी आणि बाळशारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सशक्त झालो.
आजही आई कडून रोज नव्या टिप्स मिळतातच कि बाळासाठी काय करायचंआणि काय नाही.एकदा मी तिला म्हणलं, आई मी जॉब सोडते मी बाळालामाझा पूर्ण वेळ देऊन गुड मम्मा होते. तर, ती म्हणाली कि जॉब करणारीमम्मा गुड मम्मा नसते असं असत का? आईपण बाळा सोबत रोज शिकतअसते.बाळाची काळजी घेणे आणि बाळासोबत स्ट्रॉंग पणे उभं राहणे म्हणजेआई होणे.एकदा आई झालं कि अडकल्याची भावना न येणे म्हणजे आई, आई अडकत नाही ती स्ट्रॉंग होते.एक मानसिक आणि शारीरिक रुपी सशक्तआई च चांगलं बाळ घडवू शकते.
आई च्या याच गोष्टींनी मी आणि बाळ खूप पॉसिटीव्ह व्हायचो.
मी थोडीफार आई म्हणून सशक्त झाले आणि परतीची वेळ आली.तेच आईने बाळंतविडा बद्दल सांगितले.
बाळंत बाई आणि बाळाला जेव्हा सासरची मंडळी न्यायला येतात तेव्हा तेबाळंतविडा घेऊन येतात.
माझ्या नवऱ्याने माझ्याच पसंतीने आईला, बहिणीला, वडलांना आणिमेव्हण्याला कपडे बाळाला कपडे आणि दागिना, सासूबाईंनी लाडू असे सगळेघेऊन मला आणि बाळाला न्यायला आले होते.
आई पप्पांनी आणि बहीण मेव्हण्याने पण माझ्या सासू सासर्यांना, नवऱ्याला, मला कपडे, बाळाला दागिना आणि कपडे असे सगळे घेतले होते.
जेव्हा लक्षात कि उद्यापासून आई नाहीए बाळाचं आपल्यासोबत काहीपाहायला, तेव्हा भोवळ यायची बाकी होती.तसं नवरा म्हणाला कि, "तूकाळजी करू नकोस आपण दोघे मिळून करूयात पण तो आत्मविशासदिसतंच नव्हता" तसं तोही तर नवीनच बाबा झाला होता.
रात्री बाळाच्या आवाजाने माझ्याही आधी उठणारी आई, आज नसेलमाझ्याजवळ या विचाराने ब्रह्मांड काय असते ते दिसले.
लग्नाच्या विदाई मध्ये पण एव्हडी रडले नव्हते तेव्हडी तेव्हा रडले.आई च्याकुशीत शिरून बाळापेक्षाही लहान होऊन रडत होते.पप्पा समजावत होते, "अंग आम्ही काय लांब आहोत का तुझ्या एका कॉल वर दहा मिनिट मध्येपोहचू". पण मन मानत नव्हतं.तस तर फक्त पाच किलोमीटर अंतर आहेमाझ्या सासर- माहेर मध्ये पण त्यादिवशी पाचशे किलोमीटर एव्हडं जाणवतहोत.त्यादिवशी दिवस खूप लवकर पळतोय असं वाटत होत.सगळं इथंचगोठून जावं असं वाटत होत.
संध्याकाळ झाली जेवण झाले, सासर माहेर चे आहेर-माहेर झाले आणिनिघण्याची वेळ आली.हुंदका फोडून रडणं कोसळलं खूप खूप रडू आलं.
तेव्हा एक गोष्ट मात्र प्रखरतेने जाणवली.आई झाल्यावर सगळ्यात जास्तगरज आई ची असते आणि सगळ्यात जास्त जवळ फक्त आई च असते.आईशिवाय लेकीचं बाळंतपण कोणीच करू शकत नाही म्हणूनच कदाचितमाहेरी जाण्याची प्रथा रूढ झाली असावी.खरं तर आई मुलाला एकदाच जन्मदेते पण मुलीला दोनदा देते.
एकदा स्वतःची मुलगी म्हणून आणि एकदा एका तान्हुल्याची आई म्हणून.
तो बाळंतविडा मला एखाद्या सणापेक्षाही मोठा वाटला कारण तिथे काहीचलॉजिकल नव्हतं सगळं फक्त इमोशनल होत.प्रत्येकीच्या आयुष्यात हा क्षणएकदा तरी यावा एकदा तरी प्रत्येकीने बाळंतविडा नक्की उपभोगावा.
हे लिखाण माझ्या आई साठी समर्पित जिच्यामुळे मी आणि माझं बाळ आजसशक्त आहोत..
आई तुला Thank You हे खूप कमी शब्द आहेत.तरीही Thank You ...खूपसार Thank You मला पुन्हा आई म्हणून जन्म दिल्याबद्दल....
-किर्ती
No comments:
Post a Comment